सगळ्यात पहिले आपण अक्षय तृतीये च अर्थ जाणून घेऊयात.
Akshaya Tritiya 2023 |
अक्षय तृतीयेचा अर्थ
अक्षय म्हणजे "कधी हि न संपणारे" या दिवशी केलेली प्रार्थना ,जप किंवा कुठले हि केलेले शुभ काम हे आजीवन म्हणजेच अक्षय फळ देणारे असते . म्हणून ह्याला अक्षय तृतीया असे म्हणतात .अक्षय तृतीया का साजरी केली जाते ?
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण आहे . तसेच हिंदू धर्मा सोबत जैन धर्मात देखील ह्याचे फार महत्व आहे . सर्व हिंदू व जैन बांधव फार उत्साहाने हा सण साजरी करतात .अक्षय तृतीये चे महत्व
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णू ने परशुरामाच्या रूपात पृथ्वी वर अवतार घेतला होता . आणि ह्या दिवशी भगवान विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वी वर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस भगवान परशुराम ह्यांचा जन्मदिवस म्हणून देखील मानल्या जातो. भगवान परशुराम हे ब्राम्हण कुटुंबात जन्माला आले . भगवान परशुराम हे सप्तर्षींपैकी एका ऋषींचे म्हणजेच जमदग्नी आणि रेणुका ह्यांचे पुत्र होते आणि म्हणूनच परशुराम जयंती व अक्षय तृतीया हिंदू बांधव अतिशय थाटामाटात व आनंदाने साजरी करतात .या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो.पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते.
उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते.
ज्या प्रमाणे ह्या दिवशी केलेल्या कामाचे पुण्य कधी हि संपत नाही तसेच ह्या दिवशी लग्न करणे देखील खूपच शुभ मानले जाते आणि पती पत्नी मधील प्रेम हे निरंतर टिकून राहते . लग्नव्यतिरिक्त घराची वास्तुशांती ,मुंज ,उपनयन संस्कार तसेच नवीन व्यवसाय सुरु करणे इत्यादी कार्ये शुभ मानली जातात . तसेच अनेकजण ह्या दिवशी सोने,दागिने व नवीन वस्तू ,वास्तू खरेदी करतात
पुराणानुसार, महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात,
‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवना चा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते.’
वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होते .
अक्षय तृतीया का म्हणतात ?
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै:।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव।
पुराणानुसार, महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात,
‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवना चा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते.’
वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होते .
तर मित्रांनो तुम्हाला वरील माहितीआवडली असल्यास हि माहिती तुमच्या मित्र परिचितांना देखील शेयर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्स द्वारे कळवा .
धन्यवाद !!!